महाराष्ट्रातही राजकीय भूकंप? काय म्हणतात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

aathawale
aathawale

नागपूर : मध्यप्रदेशात जे घडले, तिच परिस्थिती महाराष्ट्रातदेखील निर्माण होऊ शकते. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत यावे. अन्यथा मध्यप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची दाट शक्‍यता आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या अंत्यसंस्कारासाठी नागपुरात आले असता, सोमवारी (ता.17) रविभवन येथे ते बोलत होते.
"गो कोरोना'ची अशी कोरोना विषाणूबाबत जागृती करूनच पत्रकारांशी संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली. कोरोना खरोखरच जायला हवा असे सांगत सर्वांनी काळजी घ्यावी. सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आठवले म्हणाले, मध्यप्रदेशमध्ये जो राजकीय भुकंप आला, त्याला भाजप जबाबदार नाही. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पक्षाने अन्याय केला तसेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या नेतृत्वात देशाचा विकास अशक्‍य असल्याचे दिसून आले यामुळे त्यांनी पक्ष सोडला आणि मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले. मात्र 26 मार्चपर्यंत कोरोना कमलनाथ सरकारच्या मदतीला आला. बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रचंड वेळ मिळाला असून तो द्यायला नको होता, असे आठवले म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना असा अधिकचा वेळ मिळाला असता तर महाराष्ट्रात भाजपचे सरकार असते. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडली आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात काम करत असल्याची टिका आठवले यांनी केली. यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष भूपेश थुलकर उपस्थित होते.

राहुल गांधींची अनावश्‍यक टिका
कॉंग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करतात. त्यांच्यावर अनावश्‍यक टीका करतात. यामुळे पंतप्रधानांची नाही तर खुद्द राहुल गांधींची प्रतिमा मलिन होत आहे. असे मतदेखील आठवले यांनी व्यक्त केले. केंद्राने आता पाकव्याप्त काश्‍मीर ताब्यात घ्यावा, असेही यावेळी सांगितले. लंडन येथील डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानी स्मारक उभारण्यात आले. मात्र लोक न्यायालयात गेले. परंतु आता या स्मारकाला अधिकृत परवानगी मिळाली असल्याचे लंडन प्रशासनाने केंद्रीय मंत्रालयाला कळविले असल्याची माहिती यावेळी आठवले यांनी दिली.

बाबासाहेबांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच ब्राह्मणांचा विरोध केला नाही. चिटणीस, चित्रे असे अनेक ब्राह्मण बाबासाहेबांसोबत होते. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा रोख हा राऊत यांचा रोख ब्राह्मणांवर नसून भाजपावर असू शकतो. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काय ते ठरवावे, असे आठवले म्हणाले. भाजप आता ब्राह्मणांचा राहिला नाही. बहुजनांचादेखील हा पक्ष आहे.
रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com