तुकाराम मुंढेंनी काढला वचपा? काय आहे प्रकरण वाचा

file photo
file photo

नागपूर : सभा घेण्यासाठी भट सभागृह नाकारत महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वचपा काढल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. 
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून होते. फेब्रुवारी 2008 ते रुजू सीईओ म्हणून रुजू झाले. जवळपास सव्वा वर्ष पदावर होते. मुंढेंच्या कामाची शैली तशीच होती. पदाधिकारी, सदस्यांना विश्‍वासात घेत नाही, मान देत नाही, समितींना विश्‍वासात न घेताच निर्णय घेत असल्याचा आरोप होता. त्यामुळे ऑगस्ट 2008 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव घेण्यात आला. त्यावेळी जिल्हा परिषेदत भाजप, शिवसेनेची सत्ता होती. रमेश मानकर अध्यक्ष होते. तर विद्यमान कृषी सभापती तापेश्‍वर वैद्य त्यावेळी उपाध्यक्ष होते. 

त्यांचा पुतळाही तत्कालीन सदस्यांनी जिल्हा परिषदच्या आवारात जाळला होता. सभा चांगलीच वादळी ठरली होती. सभेत तत्कालीन सीईओ तुकाराम मुंढे यांनी जवळपास 40 मिनिटे भाषण दिले. यात त्यांनी पदाधिकारी, सदस्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. परंतु, सदस्यांचे समाधान झाले नाही आणि अविश्‍वास ठराव घेण्यात आला. याला जवळपास सर्वच सदस्यांनी समर्थन दिले. सभेत असलेल्या पंचायत समिती सभापतींनी मतदान केले नाही. हा धागा मुंढे यांनी धरला. प्रकरण शासनस्तरावर गेले. शासनाने मुंढेचा मुद्दा मान्य केला आणि अविश्‍वास ठराव फेटाळून लावला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मुंढेना असल्याने त्यांनी जि. प.चा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा होती. भट सभागृह देण्यास नकार देताना महापालिकेने कोणतेही कारण दिले नसले तरी अविश्‍वास ठराव घेतल्यानेच सभेकरिता सभागृह देण्यास नाकारल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. सभागृह नाकारून मुंढेंनी अविश्‍वास ठरावाचा वचपाच काढल्याचीही चर्चा रंगली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com