यंदा पाच हजार शाळा होणार बंद!

School
School

नागपूर - आर्थिक भार कमी करण्यासोबत दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय  घेतला आहे. राज्यात मागील वर्षी १३०० बंद केल्यानंतर यावर्षी हा आकडा ५ हजारांच्या जवळपास असलेल्याचे सांगण्यात येते. नागपूर जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. या शाळेतील शिक्षक आणि सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत होणार खर्च गृहीत धरल्यास एका शाळेवर वर्षाला १५ लाखाच्यावर खर्च होत आहे. सर्व शाळांचा लक्षात घेतल्यास कोट्यवधींचा खर्च होतो. हा खर्च बचतीचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण सचिवांनी यासंदर्भात एक बैठक घेतली. २० पेक्षा कमी व जास्त पटसंख्या असलेल्या शाळांचा आढावा घेतला. कमी पटसंख्या असलेल्या ५ हजार शाळा बंद करण्याचे टार्गेट यावर्षी शिक्षण विभागाचे असल्याचे सांगण्यात येते. नागपूर जिल्हा परिषदेच्या १५५५ शाळा असून, ४३०० शिक्षक कार्यरत आहे. कमी पटसंख्येच्या शाळांना बंद करण्याचे दुसरेही कारण आहे. या शाळांमधील विद्यार्थी अप्रगत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची शिकविण्याची तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची मानसिकता ढासळलेली असल्याचा निष्कर्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com