अंदाजाच्या दुप्पट शेतीपिकांचे नुकसान 

file photo
file photo

अमरावती : विभागात ऑक्‍टोबरमधील अवेळी पावसाने 6,903 गावांतील 18.97 लाख शेतकऱ्यांचे 21.80 लाख हेक्‍टर क्षेत्रातील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. संबंधित नुकसान प्राथमिक अंदाजाच्या दुप्पट असल्याची बाब संयुक्त सर्वेक्षणातून समोर आलेली आहे. 
जिल्हानिहाय नुकसानाचे क्षेत्र अमरावती 4.03 लाख, अकोला 3.84 लाख, यवतमाळ 5.23 लाख, बुलडाणा 5.65 लाख, वाशीम 3.03 लाख हेक्‍टर आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषानुसार 33 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त नुकसानाचे पीकनिहाय तसेच विमाधारक व विनाविमाधारक शेतकरीनिहाय वर्गीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. निकषानुसार कोरडवाहू 6,800 रुपये, बागायती 13,500 रुपये व फळपिकांसाठी 18,000 रुपये हेक्‍टरी (दोन हेक्‍टरच्या मर्यादेत) मदत दिली जाते. 

या निकषामध्ये किती क्षेत्र व किती शेतकरी बसतात. त्यांना एकूण किती मदत देय होऊ शकते, याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यातर्फे बुधवारपर्यंत (ता. 13) सरकारला सादर केला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरीय यंत्रणा कामाला लागलेली आहे. विभागात ऑक्‍टोबरमधील अवेळी पावसाचा 94.58 टक्के गावांना, 92.66 टक्के शेतकऱ्यांना व 69.91 टक्के शेतीला फटका बसलेला आहे. राज्य सरकारतर्फे 29 ऑक्‍टोबरला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश यंत्रणेला दिले होते. 

अंदाज व प्रत्यक्ष नुकसानात तफावत 
सरकारतर्फे सर्वेक्षणाचे आदेश मिळण्यापूर्वी यंत्रणेने नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेतला तेव्हा विभागात 11 लाख 74 हजार 215 हेक्‍टर शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. प्रत्यक्ष सर्वेक्षणात नुकसानाचे क्षेत्र 21 लाख 80 हजार 584 हेक्‍टरवर पोचले. म्हणजेच प्रत्यक्ष सर्वेक्षणात 10 लाख 6 हजार हेक्‍टर क्षेत्र वाढले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com