एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही : मुख्यमंत्री

File photo
File photo

गडचिरोली : जुन्या सरकारने शेतकऱ्यांना 15 वर्षांत 30 हजार कोटी रुपये दिले. परंतु, भाजप सरकारने अवघ्या 5 वर्षांत 50 हजार कोटी रुपये दिले असून यंदा ऐन वेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यावर ओढवलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे. शेतकऱ्यांना जेवढी मदत लागेल तेवढी करू राज्यातला एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाजनादेश यात्रेनिमित्ताने ते गडचिरोलीत आले असता सोमवारी (ता.5) जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री परिणय फुके, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, रवींद्र ओल्लालवार उपस्थित होते.
श्री.फडणवीस पुढे म्हणाले, विरोधी पक्ष 21 तारखेला मोर्चा काढणार आहेत. मात्र, हा मोर्चा शेतकरी, मजूर किंवा महिलांच्या हक्कांसाठी नसून, तो ईव्हीएम विरोधात आहे. ईव्हीएम मत देत नाही तर जनता मत देत असते, हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुणी सांगावं, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीत मोठमोठे नेते वाहून जाणार आहेत. विरोधी पक्षनेते जनतेपासून दूर जात आहेत. त्यांना पराभव समोर दिसतो आहे, असे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करून त्यासाठी 3 हजार कोटी रुपये दिले. आदिवासी विद्यार्थ्याना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. राज्यात 50 हजार विद्यार्थी अशाप्रकारच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जुन्या सरकारने शेतकऱ्यांना15 वर्षांत 30 हजार कोटी रुपये दिले. परंतु, भाजप सरकारने अवघ्या 5 वर्षांत 50 हजार कोटी रुपये दिले. पाच वर्षांत प्रत्येक वर्षी धानाला बोनस दिला. मागच्या वर्षी 500 रुपयांचा बोनस दिला. यंदाही तो देणार आहोत. शेवटच्या वंचित शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय सरकारची कर्जमाफी होणार नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाच वर्षांत 30 हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तयार केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पोलिस दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले, एक सुदैवी घटना सोडली तर पोलिस दलाची चांगली कामगिरी केली. नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे किवा निर्णायक लढाईला समोर जावे, असे आवाहन त्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com