अमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम

रामदासपेठ - ‘सकाळ’च्या कार्यालयात संवाद साधताना दिग्दर्शक नागराज मंजुळे, सोबत अभिनेत्री देविका दफ्तरदार व श्रीनिवास पोकळे.
रामदासपेठ - ‘सकाळ’च्या कार्यालयात संवाद साधताना दिग्दर्शक नागराज मंजुळे, सोबत अभिनेत्री देविका दफ्तरदार व श्रीनिवास पोकळे.

नागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज (सोमवार) शिक्कामोर्तब केले. गेल्या अनेक दिवसांपासून या  विषयावर शक्‍यता आणि अशक्‍यतांचे सावट होते, मात्र मंजुळे यांनी नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रीकरण सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. ‘सकाळ’च्या रामदासपेठ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.

फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर नागराज मंजुळे यांची कथा आणि दिग्दर्शन असलेला चित्रपट येतोय. यात बारसे यांचे पात्र अमिताभ बच्चन साकारणार आहेत. नागराज म्हणाले, ‘विजय बारसे यांच्या 

कामाच्या प्रेमात पडल्यामुळे हा चित्रपट करतोय. झोपडपट्टीतील दीन-दलित उपेक्षितांसाठी त्यांनी केलेले कार्य मला अधिक प्रेरणा देऊन गेले. त्यामुळे मी स्वतः कथा लिहिली आणि माझ्या चष्म्यातून त्यावर चित्रपट करतोय. मी त्यांच्या कामाचा अभ्यास  केला, त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि मगच चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. यात सारेच वास्तव नसेल, काही गोष्टी काल्पनिकही असणार आहेत.’ फार कमी कालावधीत कथा आत्मसात  करण्याचे कौशल्य बच्चन साहेबांमध्ये आहे. त्यामुळे बारसे आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घडून द्यायची आतापर्यंत तरी गरज पडली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘सकाळ’च्या २०१४ मधील ‘दीक्षा’ विशेषांकात नागराज यांची कविता होती. ही कविता त्यांनी सादर केली. यावेळी ‘नाळ’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला बालकलावंत श्रीनिवास, अभिनेत्री देविका दफ्तरदार व तक्षशीला वाघधरे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, मंगेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

शिवाजी महाराजांवर चित्रपट करायचाय
चित्रपट क्षेत्रातही नव्हतो तेव्हा ‘३००’ हा हॉलीवूड सिनेमा बघून शिवाजी महाराजांवर चित्रपट करण्याची कल्पना सुचली होती. माझ्या आयुष्यातील हा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एक लढवय्या राजा, कुशल प्रशासक असे कितीतरी कंगोरे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. ते सारे चित्रपटात कैद करण्याचा विचार आहे, असेही नागराज म्हणाले.

शूटिंगला नव्हे, चित्रपटाला गर्दी करा
अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेक्षकांचे प्रेम वर्णनाच्या पलीकडचे आहे. पण, ‘झुंड’च्या चित्रीकरणाला लोकांनी गर्दी केली तर शांततेत काम होणार नाही. त्यामुळे नागपूरकर चाहत्यांनी शूटिंगला नव्हे, तर चित्रपटाला गर्दी करावी, असे आवाहन नागराज मंजुळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com