एम. फिल.चे महत्त्व संपले

File photo
File photo

अमरावती : यूजीसीच्या नियमानुसार आता प्राध्यापकाच्या नोकरीसाठी नेटसेट उत्तीर्ण होणे असल्याने एम. फिल.चे महत्त्व नगण्य झाले आहे. विशेष म्हणजे एम.फिल.च्या पदवीवर कुठेही नोकरी मिळणार नाही. एम.फिल.ची पदवी म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात कागदाचा तुकडा ठरेल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 2009 व 2016 मध्ये एम.फिल. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पूर्व परीक्षेची अधिसूचना काढली होती. पण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एम.फिल.ला फारसे महत्त्व उरले नाही. जे सध्या प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत त्यांच्या वेतनवाढीसाठी ती उपयोगाची आहे. एम.फिल. हे पूर्वी केवळ वाणिज्य शाखेत होते. पूर्वी एम.कॉम. झाल्यानंतर विद्यार्थी सरळ एम.फिल. करायचे. एम.कॉम.एम.फिल झालेला विद्यार्थी किमान प्राध्यापकाच्या नोकरीसाठी प्रमाणित धरला जात होता. परंतु, आता केंद्र व राज्यशासनाने यामध्ये बरेच बदल केले आहेत. केंद्रीय महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्राध्यापक व्हायचे असल्यास नेट आणि राज्यातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. यामुळे नेटसेट परीक्षा बंधनकारक असल्याने एम.फिल.चे महत्त्व संपले आहे. त्यात पी.एच.डी. सोबतीला आहेच. पीएच.डी.मुळे प्राध्यापकांच्या वेतनात वाढ होते. विद्यापीठ कायद्यानुसार विज्ञान व इतर विषयासाठी एम.फिल. आता करता येते. परंतु, ही पदवी म्हणजे नोकरीसाठी प्रमाणित नसल्याने याला फारसे महत्त्व राहिले नाही.
कुठलीही नोकरी मिळणार नाही
प्राध्यापकासाठी नेटसेट किंवा पीएचडी यूजीसीने बंधनकारक केले आहे. यामुळे आता एम.फिल. पदवीमुळे प्राध्यापकाचीच काय, कुठलीही नोकरी मिळणार नाही, असे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.संतोष ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com