अमरावती परिवहन महामंडळातील बसेसना 250 टायर्सची आवश्यकता

Amravati Transport Corporation Buses Needs 250 Tyers
Amravati Transport Corporation Buses Needs 250 Tyers

अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात तब्बल अडीचशे टायरचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास केला जात आहे. टायरशिवाय आगारात उभ्या असलेल्या बस टायरशिवाय चालणार कशी ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

महामंडळाच्या लालपरीला पर्याय म्हणून दिवसेंदिवस शिवशाही बसेसचा ताफा दाखल होत असताना दुसरीकडे टायरच्या तुटवड्यामुळे जुन्या, रिमोल्ड व चोपडे झालेले टायर रस्त्यावरुन धावत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला. टायरचा तुटवडा ही गंभीर बाब असताना या समस्येकडे दुर्लक्ष करुन शिवशाहीला महत्व दिले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

प्रवाशांच्या जीविताला धोका असलेल्या चोपड्या झालेल्या टायरकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शंभर टायरचा पुरवठा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अजून अडीचशे टायरची आवश्यकता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बहुतांश बस जुनाट टायरवरच प्रवास करत आहेत. वारंवार तक्रारी, निवेदने देऊनही महामंडळाच्या कारभारात फरक पडत नसल्याने प्रवाशांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com