भंडारा : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची बळीराजा चातकाप्रमाणे वाट पाहत होती. उशिरा का होईना वरुणराजाने त्यांची हाक ऐकली असून मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा मिंळाला आहे. पावसामुळे जिल्हा जलमय झाला असून शेतात पाणी साचले आहे. तर, रोवणीच्या कामाला वेग आला आहे.शनिवार (ता. 27) पासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी, दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सोमवारपासून तर दिवसभर संततधार पाऊस होत असल्याने खोलगट भागासह शेतजमीनी जलमय झाल्या आहे. आजवर कोरडे असलेले नदीनाले दुथडी वाहू लागले आहे. पाऊस नसल्याने वाढते तापमान घसरले असल्याने वातावरणात थंडावा आला आहे.पावसाने हजेरी लावताच धान नर्सरीला जीवदान मिळाले. लगेच शेतकऱ्यांनी रासायनिक खते टाकल्याने नर्सरी रोवणीयोग्य झाली आहे. यामुळे सध्या रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर, लाखांदूर तालुक्यात पावसामुळे शेती जलमय झाल्याने रोवणी पाण्यात बुडाली आहे. खोलगट भागात पाणी साचले असल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीतील पाणी काढण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
24 तासांत 28.5 मिमी पाऊस
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 28.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात 106.4 मिमी झाला आहे. तर, भंडारा तालुक्यात 6.3 मिमी, मोहाडी 3.3 मिमी, साकोली 6.8 मिमी, लाखांदूर 67.1 मिमी व लाखनी तालुक्यात 9.6 मिमी पाऊस झाला. आजपर्यंत पावसाची तूट भरून निघाली नसली तरी संततधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.