बुलडाणा : बियाणे बोगस निघण्याची धास्‍ती

बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन‎
Fake Seeds
Fake Seedssakal

खामगाव : मागील वर्षी कापसाला मिळालेला ‎ चांगला दर, कांदा, ऊस‎ उत्पादकाची झालेली अवस्था‎ पाहता, या वर्षी कपाशीचे क्षेत्र‎ वाढणार असल्याचा अंदाज आहे.‎ त्या पार्श्वभूमीवर मागणी असलेल्या ‎ ‎ कपाशीच्या बोगस बियाण्याची‎ विक्री होण्याची शेतकऱ्यांनी धास्ती ‎ घेतली आहे.‎ शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी‎ करताना काळजी घेण्याबाबत कृषी ‎ ‎ विभागाने सल्ला दिला आहे.‎

जिल्ह्यात गतवर्षी काही ठिकाणी बोगस खते आणि ‎ ‎ बियाण्यांच्या विक्रीवर झालेल्या कारवाईमुळे आपण घेतलेले बियाणे‎ व खते बोगस तर नाही, असा प्रश्न‎ तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला‎ आहे. कापसाला गतवर्षी चांगला दर‎ मिळाला. कांद्याचे क्षेत्र वाढले. गत‎ वर्षी खरीप व रब्बी हंगामातही‎ कांद्याची दुप्पट लागवड झाली. मात्र‎ दर नसल्याने कांदा उत्पादक हतबल‎ झाला. कांदा उत्पादकांचा उत्पादन‎ खर्चही निघाला नाही. त्याचा‎ ‎ परिणाम या वर्षी खरीप हंगामावर‎ होणार असून साधारणपणे कापूस,‎ सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढू शकते,‎ असा अंदाज शेतकरी व कृषी‎ विभागाकडून वर्तवला जात आहे.‎

कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा‎ अंदाज बांधून कृषी विभागाने‎ बियाण्यांची मागणी केली आहे‎ आहे. कापसाच्या बियाण्याला‎ होणारी अधिक मागणी पाहता‎ ‎ मागील वर्षी अधिक उत्पादन‎ देणाऱ्या काही ठराविक वाणाच्या‎ बियाण्यांची बोगस विक्री होण्याची‎ शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी‎ धास्ती घेतली आहे. शेतकऱ्यांनी‎ बियाणे खरेदी करण्यापुर्वी काळजी‎ घ्यावी. शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्त‎ बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी‎ करावी, पक्के बील, त्यावर‎ खरेदीदार व विक्रेत्याची सही‎ असावी, बियाणे सीलबंद‎ पाकिटातील असावे, लागवडीसाठी‎ घेतलेले बियाणे लागवड‎ केल्यानंतरही थोडे बियाणे हंगाम‎ संपेपर्यंत शिल्लक ठेवावे, सातबारा‎ नावे असलेल्या शेतकऱ्याच्या‎ नावेच बियाणे खरेदी करावी, असे‎ आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी‎ विभागाचे कृषी विकास अधिकारी‎ यांनी केले आहे.‎

बियाणे खरेदी‎ करण्यापूर्वी काळजी घ्यावी

लागवड केल्यानंतर थोडे‎ बियाणे शिल्लक ठेवा‎ शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी‎ करण्यापूर्वी काळजी घ्यावी. मान्यता‎ प्राप्त बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे‎ खरेदी करावी. पक्के बील, त्यावर‎ खरेदीदार व विक्रेत्याची सही‎ असावी. बियाणे सीलबंद‎ पाकिटातील असावे. लागवडीसाठी‎ घेतलेले बियाणे लागवड‎ केल्यानंतरही थोडे बियाणे हंगाम‎ संपेपर्यंत शिल्लक ठेवावे. सातबारा‎ नावे असलेल्या शेतकऱ्याच्या‎ नावेच बियाणे खरेदी करावी, असे‎ आवाहन कृषी विभागाने केले आहे.‎

कृषी विभागाकडून वॉच;‎ शेतकऱ्यांनी करावी तक्रार‎

या संदर्भात सर्व क्षेत्रीय अधिकारी‎ आणि कृषी सहाय्यक यांचे पथक‎ तयार करण्यात आले आहे.‎ जेवढ्या तक्रार आल्यात, त्यांची‎ चौकशी सुरू आहे. कृषी केंद्र‎ चालकांवर कृषी विभागाकडून वॉच‎ ठेवण्यात आला आहे. बोगस खते,‎ बोगस बियाण्यांची आणि चढ्या‎ दराने जर कृषी केंद्र चालक विक्री‎ करीत असेल, तर शेतकऱ्यांनी‎ आमच्याकडे तक्रार दाखल करावी.‎ असे आवाहन तालुका कृषी‎ अधिकारी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com