तर दुसरे "मोवाड" घडले असते : पेंचचा कालवा फुटला; आजनी गावात पूर 

तर दुसरे "मोवाड" घडले असते : पेंचचा कालवा फुटला; आजनी गावात पूर 

रामटेक (जि. नागपूर) : पेंच धरणातून धानपट्ट्याकडे जाणारा मुख्य कालवा फुटल्याने तालुक्‍यातील आजनी गावात पाणी शिरेल. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या, अन्नधान्य भिजले. या घटनेमुळे पेंच कालव्याच्या दुरुस्ती व देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 
आजनी गावात शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आमडी-मौदा कालवा फुटून पाणी गावात शिरले. गावातील रस्ता नाला बनून वाहू लागला. अनेकांच्या घरात कालव्याचे पाणी शिरू न नुकसान झाले. सुदैवाने सूर्यलक्ष्मी कॉटन मिलचे कामगार गावात परतल्याने पाणी गावात शिरल्याचे त्यांनी गावकऱ्यांचे लक्षात आणून दिल्याने अनर्थ टळला. धानपिकाला पाण्याची गरज असल्यामुळे कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. दुथडी भरू न वाहणाऱ्या कालव्याची भिंत जीर्ण असल्याने पहाटे दीड वाजताच्या सुमारास कालवा फुटला. गावापासून साधारणतः अर्धा किमी असलेल्या कालव्याचे पाणी पहाटे तीन वाजताच्या सुमारास कालव्याशेजारी असलेल्या शेतातील पिकांना खरवडून काढत गावात शिरले. गाढ झोपेत असलेल्या गावकऱ्यांना याची जाणीवच नव्हती. याचवेळी सूर्यलक्ष्मी मिलचे कामगार गावात परत येत असताना त्यांना गावात पाणी शिरल्याचे दिसले. लगेच त्यांनी गावकऱ्यांना सावध करायला सुरुवात केली. त्यामुळे गावकरी खडबडून जागे होत आपल्या घरातील साहित्य, भांडीकुंडी, कपडे, अन्नधान्य वाचवण्याच्या कामाला लागले. तोपर्यंत अनेक घरांत कालव्याचे पाणी शिरले होते. गावाच्या रस्त्याच्या डावीकडील भागातील घरांना याचा जास्त फटका बसला.
सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. नागेश्वर वाट, सुखदेव नारायण बसिने, आनंदराव गराडे यांची घरे जिर्ण असून त्यांच्या घरांना धोका पोहोचू शकतो. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्‌यारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी पटवारी बांगर यांचेसह गावात जाऊन परिस्थितिचा आढावा घेतला. दुपारी गावातील पाणी ओसरणे सुरू झाले होते. सकाळी निवडणूकीतील उमेदवार ऍड. आशिष जयस्वाल, आमदार डी.एम.रेड्डी, रमेश कारामोरे, संजय सत्येकार यांनीही गावाला भेट दिली. प्रशासनातर्फे चौकात मोठा मंडप उभारून गावकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र गावकरी घर सोडायला तयार नव्हते. कालव्याचे पाणी जिथे कालवा फुटला तिथून 25 शेतकऱ्यांच्या शेतीला खरवडून पाणी गावात शिरले त्या शेतीतील पाणी ओसरल्याशिवाय नुकसान किती झाले याची माहिती देता येत नसल्याचे पटवारी बांगर यांनी सांगितले. 

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष 
जिथे कालव्याची भिंत फुटली ती भिंत जिर्ण झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अभियंता, कर्मचारी यांना बरेचदा देण्यात आली. मात्र त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, असे मत गावकरी व्यक्त करीत आहेत. कर्मचारी वेळेवर पोहोचले नसते तर काय झाले असते याची कल्पना करणेच भीतीदायक आहे. दुसरे "मोवाड" घडणे अशक्‍य नव्हते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com