चंद्रपूर ः पूरग्रस्त शेतात सौरपंपाचा अट्टहास

file photo
file photo

चंद्रपूर ः पूरग्रस्त शेतात सौरपंपाचा अट्टहास
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी थ्री फेज वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. आता मात्र महावितरणने थ्री फेजऐवजी सौरपंपाचा अट्टहास धरला आहे. पूरग्रस्त शेतातील सौरपंप शेडच्या सुरक्षेवरून बळीराजा साशंक आहे. थ्री फेज वीजपुरवठा मिळणार, या आशेने लाखो रुपये खर्चून शेतात अंतर्गत पाइपलाइन अनेक शेतकऱ्यांनी टाकली. परंतु, महावितरणाच्या बदललेल्या भूमिकेने लाखोंचा फटका बळीराजाला बसणार आहे. एकट्या गोंडपिपरी तालुक्‍यात असे तीनशेवर शेतकरी आहेत. जिल्ह्यात हा आकडा हजारोंच्या घरात आहे.
शेतकऱ्यांनी महावितरणकडे शेतकरी कृषिपंप वीजपुरवठा योजनेअंतर्गत थ्री फेज विद्युत पुरवठ्यासाठी 2017 मधे अर्ज सादर केला होता. यासाठी महावितरणकडे डिमांड त्यांनी भरला. डिमांडचा भरणा केलेले बहुतांश शेतकरी नदीकाठावरील आहेत. थ्री फेज वीजपुरवठा मिळणार ही आशा असल्याने डिमांड भरलेल्या अनेक शेतकऱ्यांनी शेतात अंतर्गत पाइपलाइनची कामे केली. यासाठी त्यांना लाखो रुपयांचा खर्च आला. डिमांडचा भरणा करून दोन वर्षांचा कालावधी लोटला असला, तरी अद्यापही महावितरणने शेतात वीजपुरवठा केला नाही.
महाविरणाचा अट्टहास
21 मार्च 2018 मधे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शासनाने सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप दिले जाणार आहे. यासाठी शेतात सौरऊर्जेचे शेड उभारले जाणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अंमलात यायच्या आधी थ्री फेजसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप घेण्याचा अट्टहास महावितरणने धरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com