सोलापूर : परिस्थिती नाजूक असल्याने आणि घर बांधण्यासाठी पैसे नसल्याने अथवा जागाच नसल्याने बेघर असलेल्या गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना देशात सुरू आहे. परंतु, या योजनेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर घरकुल योजनेत राज्यात 12 व्या क्रमांकावर असून, ठाणे अव्वल आहे. तसेच 2017-18 मध्ये राज्यात केवळ 4 टक्केच घरकुले पूर्ण झाली आहेत.
शासकीय जागांवर अतिक्रमण करून झोपडपट्टीत अथवा गावठाण जागेत राहणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. देशातील नागरिकाला मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकार योजना आखत आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या गोरगरिबांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील दीड लाख लोकांना घरकुले देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, मागील वर्षात संपूर्ण राज्यात केवळ 4.02 टक्केच घरकुलांची कामे पूर्ण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
आकडे बोलतात...
राज्याचे एकूण उद्दिष्टे
1,50,934
एकूण मंजूर लाभार्थी
1,28,634
पूर्ण घरकुले
6,071
अपूर्ण घरे
1,22,563
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.