४६७ शेतकऱ्यांच्या २७८.९२ हेक्टरवर नुकसान

नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीचे वाटप करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
४६७ शेतकऱ्यांच्या २७८.९२  हेक्टरवर नुकसान

वर्धा : मार्च, एप्रिल व मे या महिन्यात झालेला अवेळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांचे २७८.९२ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत निधी प्राप्त झाला आहे. सदर मदतीचे तातडीने वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे मध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २७८.९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून पालकमंत्री सुनील केदार यांनी मदत निधीसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षणाचे अहवाल शासनास पाठविण्यात आले होते.

४६७ शेतकऱ्यांच्या २७८.९२  हेक्टरवर नुकसान
वाहन खरेदीसाठी दसऱ्याच्या मुहूर्ताला अनेकांची पसंती

नुकतेच मिळाले ३९ कोटी

शासनाकडून नुकतेच ३९ कोटी २४ लाख इतकी नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सदर रक्कम ४६७ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय बाधित शेतकरी व मदत वाटपाचा आढावा घेऊन तातडीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले.

झालेले नुकसान

तालुका पीक (हेक्टर)

आर्वी २५२.०७

वर्धा १४.४०

सेलू ७.३०

देवळी ३.२५

कांरजा २.००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com