टाळाटाळ करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 21 ऑक्‍टोबरला जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी 1610 वाहनांची आवश्‍यकता आहे. मात्र, वाहन देण्यास विविध विभागांकडून टाळाटाळ होत आहे. आतापर्यंत विविध विभागांकडून केवळ 200 वाहने जमा झाली आहेत. सूचना देऊनही वाहन देण्यास टाळाटाळ केल्याने आगामी काळात अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
निवडणुकीदरम्यान उमेदवार तसेच प्रचार सभेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामांसाठी निवडणूक विभागाला 1610 वाहनांची आवश्‍यक आहे. यात जीप, बस, ट्रक, ऍम्बुलन्स, अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. काही वाहने कंत्राटी पद्धतीनेही घेण्यात येतील. काही वाहने शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. आजवर विभागाकडे जवळपास 200 वाहने जमा झाली असल्याची माहिती आहे. अनेक शासकीय विभागांच्या प्रमुखांना वारंवार पत्रव्यवहार व फोन करूनही त्यांच्याकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने थेट वाहन जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी एक पथकही तयार केले आहे. सार्वजनिक बांधकाम, वन विभाग व इतर काही विभागातील अधिकाऱ्यांच्या वाहने भररस्त्यात जप्त करून त्यांना आहे त्या ठिकाणीच वाहनातून खाली उतरवून वाहन निवडणूक प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने आता प्रशासनाने थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विभागप्रमुखांना नोटीसही बजावण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com