काँग्रेस महाआघाडीतील भारिप-बमसंचे द्वार बंद !

काँग्रेस महाआघाडीतील भारिप-बमसंचे द्वार बंद !

अकोला- काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडी स्थापन्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला दूरच ठेवण्यात आले. त्यातच आता भारिप-बमसंची एमआयएमसोबतची जवळीक काँग्रेस महाआघाडीत त्यांच्यासाठी द्वार बंद करणारी ठरणार आहे.

सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करणारे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी तिसरी आघाडी स्थापन करून राज्यात नवा प्रयोग उभा करण्याचा प्रयत्न यापूर्वीच केला आहे. त्यासाठी वंचित आघाडीची स्थापनाही त्यांनी केली. त्यात आता एमआयएमचाही समावेश करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित आहे.

आंबेडकर यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावर काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या उलट काँग्रेसकडून महाआघाडीबाबत झालेल्या अलिकच्या काही बैठकांमध्ये अमरावती विभागातील राजेंद्र गवई यांची उपस्थिती आणि या बैठकांपासून भारिप-बमसंला दूरच ठेवण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. आंबेडकर आणखी एक नवा प्रयोग करून ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार हे निश्‍चित आहे.

रिडालोस ते वंचित आघाडी
आंबेडकर यांनी राजकारणात एक नवा प्रयोग राबविताना 2009 मध्ये 14 पक्षांनी एकत्र येऊन ‘रिडालोस’ची स्थापना केली होती. परंपरागत मते अन् ओबीसींची सांगड घालत त्यांनी दोन वर्षांपूर्वी ओबीसींचा जागर सुरू केला. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व हाती घेत निवडणुकीचा बिगुल फुंकला व काँग्रेसला 10 जागांचा प्रस्ताव दिला. त्यात आता एमआयएमची भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com