दुष्काळी मदतीची नऊ तालुक्‍यांना हुलकावणी

file photo
file photo

अमरावती ः गतवर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने अडचणीत सापडलेल्या नऊ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने एनडीआरएफच्या निकषांनुसार अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगावसुर्जी या तालुक्‍यांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर मोर्शी तालुक्‍यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर पर्जन्यमानाच्या आधारावर 16 महसूल मंडळात दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली. दुष्काळी तालुक्‍यात नसलेली परंतु 50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 731 गावांना मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केला होता. सरकारने गतवर्षी दुष्काळी मदतीच्या एकूण 269 कोटी रुपयांपैकी पाच तालुक्‍यांसाठी 186 कोटी 36 लाख 564 रुपयांचा निधी 775 गावांतील 1 लाख 99 हजार 227 शेतकऱ्यांसाठी पाठविला. संबंधित मदतनिधी शेतकऱ्यांना देण्यात आला. मात्र 63 कोटी रुपयांची मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना अप्राप्त आहे. कोरडवाहू शेतीला 6,800 रुपये तर बागायती 13,500 आणि फळपिकांना 18 हजार रुपये प्रति हेक्‍टर (दोन हेक्‍टरच्या मर्यादेत) मदत दिली जाते. याशिवाय जानेवारी, फेब्रुवारीमध्ये वादळी हवा व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानाची 99 लाखांची मदतदेखील सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. यावर्षी पेरणीच्या वेळी मदत पदरात पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र मदतीने देखील पावसाप्रमाणे हुलकावणी दिलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com