रब्बी हंगामावर अवकाळीचे ग्रहण

bordi.
bordi.

बोर्डी :  गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदल, धुके आणि पावसाच्या सरी पडत असल्याने त्याचा तूर, हरभरा, गहू पिकावर परिणाम होणार म्हणून परिसरातील शेतकरी चिंतेत होता. आणि सोमवारी (ता.30) च्या रात्री व मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने तुरीचे फुलं गळतीला लागले आहेत त्याचबरोबर हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी पिकावरही अवकाळी पावसाचे ग्रहण लागले आहे.

शासनाकडून मदतीची आस
मागील वर्षी कोरडा दुष्काळ तर यंदा ओल्या दुष्काळामुळे परिसरातील शेतकरी होरपळून निघत आहेत. यंदा सुरुवातीला कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, त्यानंतर पावसाने जबदस्त हजेरी लावल्याने खरिपातील सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मूग, उडीद पिकासह जवळपास सर्वच पिके हातची निघूण गेली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून अतिवृष्टीची आर्थिक मदत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही. आणि आता अवकाळी पावसाने पुन्हा दहशत निर्माण करून शेतकऱ्यमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये गहू, संत्रा, हरभरा व तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसत आहे. खरीप पिकासह रब्बीचे पिकही हातामधून जातात काय? अशी भीती परिसरातील शेतकऱ्यांना वाटत आहे.

उत्पादनावर होणार घट
यंदा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेऊन खरिपातील पूर्ण कसर रब्बीवर काढण्याच्या मनसुब्याने शेतकरी पूर्ण ताकदीने पीक घेण्याच्या तयारीत लागला होता. परंतु, हवामातील सततचा बदल, धुक्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होत असल्याने त्याच्या उत्पादनावर घट होणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

आर्थिक फटका बसणार
वर्षाच्या शेवटी अवकाळी पाऊस, अचानक वाढलेली थंडी आणि ढगाळ वातावरणाणे रब्बी हंगामातील पिकाबरोबरच भाजीपाल्याच्‍या पिकाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
-अशोक चौधरी, माजी कृषी मंडळ अधिकारी, अकोट


हस्त आणि अंबिया बहार अडचणीत
अकोट तालुक्यातील काहीच प्रमाणातील शेती ओलीताची आहे. त्यामुळे ठोक पीक म्हणून संत्रा पिकाची लागवड केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे हस्त आणि अंबिया हे दोन्ही बहार अडचणीचे ठरत आहेत.
-विजय गांवडे, शेतकरी, रुईखेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com