शेतकऱ्यांचे आज अन्नत्याग आंदोलन

Farmer Agitation
Farmer Agitation

यवतमाळ - शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात मंगळवारी (ता. १९) अन्नत्याग करण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध संघटनांसह शेतकरी यात सहभागी होत आहेत. 

दरम्यान, दरवर्षी होणारे अन्नत्याग आंदोलन यंदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यता माहिती आहे. उपवास करण्याला बंदी नसली तरी अन्नत्याग आंदोलन असे नाव असल्याबद्दल प्रशासनाने आक्षेप घेतला आहे.  चिलगव्हाण येथील रहिवासी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणा, दुष्काळीस्थितीला कंटाळत १९ मार्च १९८६ रोजी आपले जीवन संपविले होते. वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमालगतच्या दत्तपूर येथे त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती.

राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून ओळखली जाते. या शेतकरी कुटुंबाला श्रद्धांजली म्हणून दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन राज्यभरात केले जाते.

हबीब यांचे राजघाटावर उपोषण
आम्ही दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळी राजघाट येथे उपवासावर ठाम असल्याचे किसान आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com