Farmer : शेतकऱ्यांची व्यथाच न्यारी! कवडीमोल भाव मिळत असल्याने तोडली पेरुची झाडे

Farmer
Farmer

रिसोड : पारंपरिक पिकाला फाटा देत रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील शेतकरी अमोल आवचार यांनी जांब या पिकाची लागवड केली होती. बाजारात कवडीमुळे भाव मिळत असल्याने शेतकरी अमोल अवचार यांनी संपूर्ण झाडे हे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जांब या पिकाची लागवड केल्यामुळे त्यांना इतर पिके घेता आली नाही त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. तरी मायबाप शासनाने यासाठी मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अमोल आवचार यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांनी दोन एकर शेतीमध्ये जांब या पिकाची लागवड केली होती. उत्पन्न अपेक्षेप्रमाणे झाले मात्र अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसला असून जाब पिकांवर रोगराईचा परिणाम झाल्याने व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी फारसा हवालदिल झाला असून अखेर त्यांनी जांबाची झाडे तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी अमोल आवचार यांना आतापर्यंत दोन लाख रुपये खर्च आला असून २५ हजार रुपयांचे उत्पन्न देखील त्यांना झाले नाही. त्यामुळे त्यांचा फार तोटा झाला असून पारंपरिक पिकाला फाटा देऊन या पिकाची त्यांनी लागवड केली. मात्र त्यांच्या पदरी शेवटी निराशाच आली. त्यांनी संपूर्ण झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी ते झाडे काढणे सुरू देखील केले आहे.

"माझ्या चार एकर शेतीपैकी दोन एकर शेतीमध्ये मी जांब या पिकाची लागवड केली होती. उत्पन्न अपेक्षेप्रमाणे झाले. मात्र अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्यामुळे व्यापारी घ्यायला तयार नसल्याने संपूर्ण झाडे करण्याचा निर्णय मी घेतला आहे."

- अमोल अवचार, शेतकरी किनखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com