शेतकऱ्यांना धक्का

file photo
file photo

यवतमाळ : जिल्ह्यातील पीकपरिस्थिती सध्या नाजूक आहे. असे असतानाही महसूल विभागाने जारी केलेल्या नजरअंदाज पैसेवारी जिल्ह्यातील पीकस्थिती उत्तम असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील दोन हजार 49 गावांची पैसेवारी 65 निघाली आहे.
सततच्या पावसामुळे पिकांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. सोयाबीन पीक हातात आले असले तरी सोयाबीनचे दाने बारीक आहेत. अनेक ठिकाणी पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्याने सोयाबीनच्या गंजी ओल्या झाल्या आहेत. परिणामी सोयाबीनचे उत्पन्न घटले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कापसाला बसण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीननंतर कापसाचे उत्पन्न घटण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी दुसरीकडे नजर अंदाज आणेवारीत जिल्ह्याची पैसेवारी 65 टक्के निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. यानंतर सुधारित व अंतिम आणेवारी बाकी असली तरी नजर अंदाज आणेवारीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. उमरखेड व बाभूळगाव या दोन तालुक्‍यांची पैसेवारी 70च्यावर आहे. झरी जामणी तालुक्‍याची पैसेवारी 58 आहे. यवतमाळ 63, कळंब 65, आर्णी 61, दारव्हा 65, दिग्रस 63, नेर 65, पुसद 64, महागाव 62, केळापूर 65, घाटंजी 64, राळेगाव 62, वणी 64, मारेगाव 66 अशी पैसेवारी निघाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा सुधारित पैसेवारीकडे लागल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com