शेतकऱ्यांनी झुगारला प्रतिबंधित बियाणे कायदा

file photo
file photo

हिंगणघाट (जि. वर्धा) : शेतकरी संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (ता.20) तालुक्‍यातील शेगाव (कुंड) येथे हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा, जीवनावश्‍यक वस्तूंचा कायदा, झुगारत मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित अप्रमाणित कापूस बियाण्यांची लागवड केली. देशात अस्तित्वात असलेल्या कायद्याने शेतकऱ्यांचे निवडीचे स्वातंत्र्य हिरावले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार त्यांचा आहे. जगातील प्रगत देशांत नवनवीन संशोधित जैविक व जनुकीय बियाण्यांचा वापर करीत आहे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनात वाढ झाली आहे. बियाण्यांचा वापर असलेल्या देशातील आयात केलेले तेल, दाळ, मोहरी चालते, तर मग देशातील शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरायला बंदी का? असा प्रश्न उपस्थित करून आता ही तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. शेतीत तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. हे आंदोलन शेतकऱ्यांनी गावागावांत करावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, राम नेवले, ललित बहाळे, सतीश दाणी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com