समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्यातील नंदोरी येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 14) सकाळी सात वाजतादरम्यान उघडकीस आली. सुरेश शंकरराव पिठाडे (वय 55 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सुरेश पिठाडे यांच्याकडे नंदोरी येथे चार एकर शेती आहे. त्यांनी नातेवाइकांकडून उसनवारी कर्ज घेतले होते. मागील पाच वर्षांपासून शेतात सतत नापिकी होत होती. राबराब राबूनही हाती काहीच पीक येत नसल्याने तो व त्याचे कुटुंब विवंचनेत होते. उसनवारी कर्ज फेडता येत नसल्याची त्यांना खंत होती. याच विवंचनेत शुक्रवारी शेताकडे गेले व गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी शोधाशोध केली असता शनिवारी शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरेशचा मृतदेह आढळला. तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.