तुरतुड्याने हिरव्या धानाची बनवली तनस

भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने याचा फटका धान पिकाला बसलेला आहे. धानावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे
तुरतुड्याने हिरव्या धानाची बनवली तनस
तुरतुड्याने हिरव्या धानाची बनवली तनसsakal News

जेवनाळा (जि. भंडारा) : भंडारा जिल्ह्यात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने आता शेतकऱ्यानं पुढे नवीन संकट येवुन ठेपला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला मावा तुडतुडा रोगांनी विळख्यात घेतले असून शेतकऱ्यांची ५० टक्के पीक नष्ट झाली आहेत.

तुरतुड्याने हिरव्या धानाची बनवली तनस
Drugs Case : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना जामीन मंजूर

भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने याचा फटका धान पिकाला बसलेला आहे. धानावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर आता मोठा संकट येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भंडारा जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

शेतकरी राजा सुखावला होता धान पिकाचे उत्पादन चांगलं होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. धानाला लोंबी देखील फुटलेली असताना शेतकऱ्यांच्या धनाला मावा, तुडतुडा हा रोग लागलेला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी होणार हा प्रश्न पडला आहे. त्यासाठी सरकारने कृषी विभागाच्या मार्फत शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

तुरतुड्याने हिरव्या धानाची बनवली तनस
पुढे ढकललेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

तीनदा फवारणी करून नियंत्रण नाही

शेतकऱ्यांनी धानावर एकरी पाच ते सात हजार रुपये खर्च करून तीन वेळा औषधी फवारणी केली तरीसुद्धा धानावरील हा रोग जात नसल्याने जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालेला आहे.

विम्याचाही लाभ मिळेना

देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागत आहे.. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी नेहमी दुखी असतो त्यासाठी शेतकऱ्यांना विमा च्या माध्यमातून तरी सरकारने आर्थिक मदत करावी तरच देशाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी उभा राहिल. परंतु विमा कंपन्यांच्या तुघलकी नियमांमुळे शेतकरी विम्याला पात्र ठरत नाही .व विमा कंपन्यांवर दावा चालत नाही.

शेतात तूर्तुद्यानी धानाची तनिस बनवली आहे.मी अनेक नामवंत कंपन्यांचे कीटकनाशक फवारणी करूनही रोगाचे नियंत्रण झाले नाही तरी शासनाला विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

- खेमराज गुरहेपुंजे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com