खतांच्या किमती भडकल्या

file photo
file photo

वणी (जि. यवतमाळ)  : सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यात रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळामुळे आधीच त्रस्त शेतकऱ्यांना खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यात पुन्हा भर पडली आहे. याचा मोठा फटका दुष्काळाचा मार सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.
रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचे खरिपाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. रासायनिक खतांच्या किमतीत 15 ते 20 टक्‍के म्हणजे एका बॅगमागे 280 रुपयांपर्यंतची वाढ नुकतीच झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतीचा उत्पादनखर्च वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती वाढल्याने खतांची दरवाढ करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खतांच्या किमतीच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने यंदा खरिपात शेतीचा लागवडखर्चही वाढणार आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यात आता खरीप पेरणी करायची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, खतांच्या दरवाढीचे नवे संकट ओढविले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com