भूजलपातळी चार फूट खोल

file photo
file photo

यवतमाळ : दिवसेंदिवस खाली जाणारी भूजलपातळी चिंतेचा विषय झालेली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 77 टक्के पाऊस झाल्यानंतरही यंदा भूजलपातळी तब्बल चार फूट खाली गेलेली आहे. परिणामी आता सगळ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत.

वाढते तापमान, पाण्याचा वाढलेला उपसा यामुळे भूजलपातळीत घट होत आहे. घट भरून काढण्यासाठी शासन, प्रशासन व सामाजिक संघटनांकडून वेगवेगळे उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, पाण्याचा भरमसाठ वाढलेला उपसा त्या तुलनेत साठा वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजना नसल्यात जमा असल्याने घट सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात जवळपास 77 टक्के पाऊस झाला. इतका पाऊस झाल्यानंतरही भूजलसाठ्यात तब्बल -1.24 म्हणजेच चार फुटांची घट झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्यात 64 पाणलोट क्षेत्रातील 181 विहिरींचे निरीक्षण केले. त्यात मोठी घट 16ही तालुक्‍यांत दिसून आली. चांगल्या पावसानंतरही घट झाल्याने भूजल सर्वेक्षण विभागही चिंतित पडला आहे. गेल्या वर्षी तब्बल 2.21 मीटरची घट झालेली होती. मात्र, 2018मध्ये पाऊस अत्यंत कमी असल्याने त्याबाबत चर्चा झाली नाही. ही घटलेली भूजलपातळीही चिंताजनक होती. गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने घट भरून निघाली होती. उन्हाळ्यात पाण्याची वाढलेली मागणी त्यासाठी खोदण्यात आलेल्या विंधनविहिरी यामुळे यंदा तब्बल चार फूट भूजलपातळी खाली गेली आहे. पांढरकवडा तालुक्‍याची भूजलपातळी तब्बल सात फूट खाली गेली आहे. राळेगाव पाच, तर यवतमाळ साडेचार फूट खाली पोहोचली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com