शहिदांचे तेराव्या दिवशी श्राद्ध घातले - डॉ. भागवत 

Mohan-Bhagwat
Mohan-Bhagwat

नागपूर - भारतीय सैन्याने पाकिस्तानात दडून बसलेल्या सुमारे साडेतीनशे अतिरेक्‍यांचा खातमा करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीदिनी पुलवामा घटनेतील शहीद जवानांच्या तेरवीचे  श्राद्ध घातले. ही भारतासाठी आनंदाची बाब असल्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचा यंदाचा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन भागवत बोलत होते.  

डॉ. भागवत म्हणाले, आपण कोणाला भयभीत करीत नाही. कोणाला मारण्याचा आपला भाव  नाही. तरी भारत शक्‍तिशाली असायला हवा. जो शक्‍तिशाली असतो त्यालाच जग घाबरते. स्वातंत्र्यवीरांनी हेच तत्त्वज्ञान देशाला सांगितले. ते आपण पूर्वीच स्वीकारले असते तर भारताचा इतिहास आज वेगळा राहिला असता, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com