"जय जगत मैत्री यात्रा' सेवाग्रामात; विनोबा भावे यांचे 125 वे जयंतीवर्ष 

vinoba bhave
vinoba bhave

पवनार (जि. वर्धा) : भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त तथा 15 नोव्हेंबरच्या पुण्यतिथी पर्वावर बुधवारी (ता. 13) रात्री उशिरापर्यंत सेवाग्राम येथे देशभरातून गांधी-विनोबांच्या विचारांना मानणाऱ्या 125 यात्रा दाखल होणार आहेत. या यात्रेला "जय जगत मैत्री यात्रा' असे नाव देण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त सेवाग्राम येथे दाखल झालेले देशभरातील सर्वोदयी कार्यकर्ते उद्या, गुरुवारी सकाळी सेवाग्राम येथून पदयात्रेद्वारे पवनार येथे पोहोचतील.

सर्वप्रथम पवनारवासींच्या हस्ते या यात्रेकरूंचे स्वागत केले जाईल. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील 11 गावांतील नागरिकांच्या हस्ते या यात्रेचे स्वागत होणार आहे. या पदयात्रेत देशभरातील सुमारे दीड हजार सर्वोदयी कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती ज्येष्ठ सर्वोदयी रमेशभाई (शहाजापूर, उत्तर प्रदेश) यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार (ता. 15) ते रविवारपर्यंत (ता. 17) पवनार येथील परमधाम आश्रम (ब्रह्मविद्या मंदिर) परिसरात मित्र मीलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 1995 ला विनोबा भावे यांच्या जन्मशताब्दीला देशभरातून अनेक पदयात्रा पवनार येथे पोहोचल्या होत्या.

"आचार्य विनोबा भावे-125'च्या आयोजनांतर्गत देशभरात विखुरलेल्या सर्वोदयी कार्यकर्त्यांचे सामर्थ्य, सहजतेला लक्षात घेत विनोबा विचार प्रवाहाला समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोचविण्याकरिता या यात्रा काढण्यात आल्या. देशभरातील विविध मार्गांनी मार्गक्रमण करीत उद्या, गुरुवारी सर्व यात्रांचे एकत्रीकरण होऊन सेवाग्राम ते पवनार अशी पदयात्रा काढली जाणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com