यवतमाळ : दिल्ली येथे लालकिला परिसरात व किसान परेडदरम्यान घडलेल्या हिंसक घटनेला दिल्ली पोलिस तसेच केंद्र सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना समर्थक व वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत तिवारी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी व कृषी संकटावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विशेष पॅकेज देऊन सुरुवात केली होती. त्यानंतर खासगी बाजार समिती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मुभा देण्यात आली. भंडारण क्षमता नियंत्रण समाप्त करणे, कापोरेट शेती यांचे प्रयोग २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
२०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, तर सोडा अजून कमी झाले. त्यामुळेच महाराष्ट्रात २०१७ व २०१९ मध्ये दोन ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी लागली. हे सत्य समोर असताना त्याच सुधारणा उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर आंदोलन सरकारच्या अंगलट आले आहे. त्यामुळे हा अनुचित दुराग्रह असल्याची भूमिका वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतली.
सर्व डाळी, सर्व प्रकारचे तेल, अन्न व जनतेला आव्यश्यक असलेला शेतात निर्माण होणाऱ्या सर्व कृषिमाल याची आयात बंदी करण्यात येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही, असे तिवारी म्हणाले. शेतीला लागणारा पतपुरवठा सरकारी बॅंका पंचवार्षिक तत्त्वावर देत नाहीत. जमीन, पाणी, जैवसंसाधने, पत आणि विमा, तंत्रज्ञान, ज्ञान व्यवस्थापन व बाजारपेठेत संबंधित मुख्य मुद्दयावर काम करण्याची गरज असताना कृषी कायद्यांना स्थगित करून नव्याने सुधारणेवर भर देण्याची विनंतीही तिवारी यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.