यवतमाळ : जिल्ह्यातून नागपूर-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांचे व रहिवासींचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर-तुळजापूर हा महामार्ग गेला असून त्याचे काम अद्यापही सुरू आहे. या महामार्गालगत असंख्य शेतकऱ्यांच्या जमीनी आहे. शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही. याशिवाय पाणी वाहून जाणारे पाइप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले. मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. त्याचेही तत्काळ सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, सिकंदर शहा, अतुल राऊत, चंदू चौधरी, दिनेश गोगरकर, संजय ठाकरे, अनिल गायकवाड, प्रा. घनश्याम दरणे अजय किन्हीकर, धनराज चव्हाण, अमन निर्बाण, जावेद अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मागील अनेक दिवसांपासून शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात पुरेसा जलसाठा झाला आहे. त्यामुळे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची मागणी शहर कॉंग्रेस कमिटीने केली आहे. याशिवाय समर्थवाडी, माईंदे चौकात खोदकाम केल्याने त्यात पाणी साचत असल्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.