फेसबुकवरून सूत जुळल्याने तीन मुलांच्या आईचे पलायन

Crime
Crime

अमरावती - सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनंतर तीन मुलांची आई मुंबईतील युवकाच्या प्रेमात पडली अन्‌ दोन अपत्यांना वाऱ्यावर सोडून एका मुलीला घेऊन तिने पलायन केले. गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. २४) याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

एजाज अन्सारी (नरिमन पॉइंट, मुंबई), असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. एजाज अन्सारी याची फेसबुकवरून अमरावतीच्या गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेसोबत काही महिन्यांपासून चॅटिंग सुरू होती. चर्चेनंतर दोघांची मैत्री घट्ट होत गेली. एजाज जिच्या प्रेमात पडला, ती तीन मुलांची आई असल्याची कल्पना त्याला होती. तिच्या भेटीसाठी तो चार दिवसांपूर्वीच अमरावतीत आला. भेट झाल्यानंतर तिने कसलाही विचार न करता संशयित एजाजसोबत ती निघून गेली. पीडित महिलेच्या पतीने याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पत्नी व मुलगी हरविल्याची तक्रार गाडगेनगर ठाण्यात नोंदवली होती. पत्नी व मुलीचे अपहरण मुंबईच्या एजाज अन्सारी यानेच केले, असा आरोप अपहृत महिलेच्या पतीने तक्रारीत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com