बापूंच्या चष्माचोरीचा आरोपी निर्दोष

Spect
Spect

वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीतून २०११ मध्ये महात्मा गांधी यांचा चष्मा चोरीला गेला होता. देशपातळीवर गाजलेल्या या प्रकरणात सीआयडीने तपासाअंती एका युवकाला अटक केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. अयाचित यांनी आरोपी कुणाल रामभाऊ वैद्य रा. हिंदीनगर याला निर्दोष मुक्‍त केले. सकाळने सर्वप्रथम या चोरीचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

सेवाग्राम येथील आश्रमात बापूकुटीत महात्मा गांधी यांनी वापरलेल्या अनेक वस्तू संग्रहित  आहेत. यातील त्यांचा चष्मा चोरीला गेल्याची तक्रार आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष मा. म. गडकरी यांनी १३ जून २०११ रोजी सेवाग्राम पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून  प्रकरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला.  

तपासाअंती सीआयडीने वर्धा शहरातील हिंदीनगर येथील कुणाल रामभाऊ वैद्य याला अटक केली होती. प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायप्रविष्ट करण्यात आले. मात्र, चोरी गेलेला चष्मा अखेरपर्यंत सापडला नाही. या प्रकरणाचा निकाल मंगळवारी (ता. २५) लागला. त्यात कुणाल वैद्य याची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली आहे. आरोपीच्या वतीने ॲड. रोशन राठी यांनी काम पाहिले.

आश्रमाने जोपासलेय बापूंचे ऐतिहासिक साहित्य महात्मा गांधी १९४६ मध्ये सेवाग्राम येथून दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांच्या बऱ्याच वस्तू सेवाग्राम आश्रमात ऐतिहासिक ठेवा म्हणून ठेवल्या आहेत. यातीलच त्यांनी वापरलेला हा चष्मा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com