ऐन दिवाळीत तोंडची साखर गायब 

file Photo
file Photo

मेंढला  (जि.नागपूर) : दिवाळीत गोडगोड खाद्यपदार्थ करून खाणे, इतरांना खाऊ घालण्याचा सण. या दिवसांत साखरेच्या मागणीत प्रचंड वाढ होते. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडची साखर गायब करून गोड दिवाळीऐवजी कडू करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत राज्यातील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थांना दिवाळीत स्वस्त दरात साखर दिली जाते. परंतु, यावेळी ऐन दिवाळीच्या पर्वातच रेशन दुकानातून साखर गायब झाली आहे. 
शासनाने काळाबाजार रोखण्याकरिता लाभार्थ्यांना पॉस मशीनद्वारे धान्य वितरित करण्याची योजना आखली. यात सर्व कार्डधारक सदस्यांना आधार कार्ड जोडणी सक्तीची केली. यात मोठ्या प्रमाणात बोगस कार्डधारक सापडले, असे सांगून अधिकाऱ्यांनी पाठ थोपटून घेतली. त्यामुळे रेशनचा काळाबाजार आटोक्‍यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या वितरण प्रणालीमध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थांना 35 किलो धान्य व साखर, त्याचसोबत एक किलो डाळीचा पुरवठा करण्यात येतो, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थांना एका व्यक्तीमागे पाच किलो धान्य व उपलब्धतेनुसार डाळ व साखर दिली जाते. परंतु, मागील वर्षांपासून साखर बंद केली असून डाळ महिण्याभरापासून आलीच नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना 55 रुपये किलोप्रमाणे मिळणारी डाळ आता 90 रुपये किलोप्रमाणे खरेदी करावी लागत आहे. मागील वर्षी ऐन दिवाळीच्या तोंडावर प्राधान्य कुटुंब लाभार्थांना साखर वितरित करण्यात आली होती. परंतु, रेशन कार्ड पुरवठा शासनातर्फे बंद करण्यात आला. सद्यस्थितीत बाजारात साखरेचे दर वाढताना दिसत आहेत. जी साखर वितरण प्रणालीत 20 रुपये किलो मिळायची ती आता बाजारातून 40 रुपये प्रतिकिलोने खरेदी करावी लागत आहे. जास्त सदस्यसंख्या असलेल्या कुटुंबांना आता साखरेशिवाय दिवाळी साजरी करावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com