सरकारच्या आदेशाची ऐसीतैसी, किराणा मालाच्या किंमती कडाडल्या 

kirana
kirana

नागपूर : करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जीवनावश्यक वस्तूंची आवक कमी झाल्याने सोयाबीन, शेंगदाणे तेल, तूर डाळ आणि तांदळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. अचानक भाव वाढवल्याने ग्राहक व व्यापारी यांच्यात वाद होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्राहक व्यापाऱ्यांनी भाव वाढवल्याच्या कारणावरून वाद होत आहेत. यामुळे व्यापारी आता साठा असेपर्यंत माल विक्री करणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
 
लॉकडाऊनला जेमतेम तीन दिवस होत नाही तोच घाऊक बाजारपेठेत गहू २,३०० रुपयांवरून २,९०० रुपये, तांदूळ जय श्रीराम ३,६०० रुपयांवरून ४,४०० रुपये क्विंटल तूर डाळ ७० रुपयांवरून ८० रुपये किलो, साखर ३४ रुपयांवरून ३८ रुपये किलो आणि तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने मध्यवर्गीय व सर्वसामान्यांवर नजिकच्या काळात आर्थिक संकट येण्याचा शक्यता आहे.

सोयाबीन तेल, तूर डाळ, तांदुळचे भाव वाढले
सोयाबीन तेल १५ किलो वजनाचा डबा 1400 रुपयांवरून 1700 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच प्रति किलो 20 ते 22 रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाणे तेल प्रती किलो 15 रुपयांनी महागले आहे.

केंद्र व राज्य सरकारने लॉकडॉऊन जाहीर करताना कुणीही दरवाढ व साठा करू नये, असे आवाहन करताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू राहील, अशी हमी दिली होती. यानंतरही बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. त्यातच नागपुरातील धान्य बाजार व कळमना बाजार बंद करण्यात आला. कळमना बंद होताच तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तो परत सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले

वाहतूकदारानाही माल उचलण्यासाठी आणि उतरवण्यासाठी कामगार मिळत नसल्यामुळे बाजारात मालाची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली. तसेच, विविध वस्तूंचा तुटवडाही सुरू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com