नागपूर : नदी, नाल्या लगतच्या पिकांचे पंचनामे

प्रशासनाचा प्रताप : जिल्हा परिषदेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
 Panchnama damage crops
Panchnama damage cropssakal

नागपूर : जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत अतिवृष्टी व शेतपिकांच्या नुकसानीवर वादळी चर्चा झाली. प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात अनेक पीक वगळण्यात आली असून फक्त नदी व नाल्या काठावरील पिकांचे पंचनामे करण्यात आल्याने नुकसानाची आकडा कमी दाखविण्यात आल्याचा आरोप सर्वच सदस्यांनी केली. सदस्यांनी तालुका व गावांच्या नुकसानाची माहिती देत प्रशासनाच्या केलेल्या पंचनाम्याचा पंचनामा केला.

गेल्या सव्वा महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात फारच कमी क्षेत्र दाखविण्यात आले. पंचनामा करताना अनेक गावे वगळण्यात आल्याचा मुद्दा सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी उपस्थित केला. प्रकाश खापरे यांनीही तो उचलून धरला. प्रशासनाने केलेले पंचनामे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

शांता कुमरे, अरूण हटवार, मिलिंद सुटे, व्यंकट कारेमोरे, राधा अग्रवालसह सर्वच अनेक सदस्यांनी त्याला साथ दिली. पंचनामे कशा पद्धतीने करण्यात आले याचा जाब विचारण्यात आला. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनीही पंचनाम्यावर नाराजी व्यक्त करीत सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आदेश दिले. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी जिल्ह्यातील एकूण क्षेत्रातील नुकसानाची माहिती दिली. परंतु, फक्त नदी, नाल्या काठच्याच शेतांचे पंचनामे करण्याच्या मुद्यावर उत्तर देता आले नाही.

हेक्टरी १ लाख मदत द्या

जिल्ह्यात शंभर टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पंचनामे चुकीचे असल्याने ते नव्याने करण्याची गरज असल्याचे अध्यक्षा रश्मी बर्वे म्हणाल्या. सर्वच क्षेत्रातील नुकसान असल्याने पंचनाम्याची गरज नसून सर्व क्षेत्रातील नुकसान गृहीत धरावे, असे काही जण म्हणाले. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व क्षेत्र गृहीत धरून हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्याचा ठराव अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी मंजूर केला. विरोधी पक्षनेते आतिश उमरे व राष्ट्रवादीचे गट नेते दिनेश बंग यांनीही त्याला समर्थन दिले.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना दुबार पेरणीही करता येणार नाही. जमीन खरडून गेल्याने रब्बीचे पीक घेता येईल का, याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले पाहिजे.

-कुंदा राऊत, सदस्य

अतिवृष्टी व पुरामुळे ज्यांची घरे पडली त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्याने घर मंजूर केले पाहिजे. वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना पशुधनाचे वाटप करण्याची गरज आहे.

- समीर उमप, सदस्य

अतिवृष्टीमुळे पूल व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी कामे करण्यासाठी शासनाने कामांच्या संदर्भात दिलेली स्थगिती उठवावी.

-मिलिंद सुटे, सदस्य

मौदा, भिवापूर, कुही, तालुक्यातील मिरची पिकांचे १ हजारांवर हेक्टरमध्ये नुकसान झाले. परंतु पंचनामे करताना त्यांचा उल्लेखच करण्यात आला नाही. त्यांना यातून वगळण्यात आले. त्यांचा समावेश करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

-दुधाराम सव्वालाखे, सदस्य

काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे नुकसान झाले आहे. परंतु पंचनामा करताना त्यांचा कोणत्याही प्रकारे उल्लेख नाही.पंचनामेचे चुकीचे आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यातून नागपूरला वगळणे योग्य नाही.

-सलिल देशमुख, सदस्य

जिल्हा परिषदेला काय देता येईल यावर भर दिला पाहिजे. सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या जास्त नुकसान झालेल्यांची माहिती घेऊन त्यांना प्राधान्याने लाभ द्यावा. सदस्यांचे मानधन करून त्यांना काही आर्थिक लाभ देता येईल का, याचीही विचार झाला पाहिजे.

-संजय झाडे, सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com