नागपूर : एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या राहुल चव्हाण (२१) आणि चैताली (१९) यांच्यात सूत जुळले. त्यांनी थेट लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाला सहा महिनेच झाले असतानाच चैतालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशाप्रकारे एका प्रेमविवाहाचा करूण अंत झाला. ही दुर्दैवी घटना पारडीत उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हा चंद्रनगर, पारडीत राहतो. त्याच्या शेजारी चैताली राहत होती. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे असल्यामुळे त्यांची ओळख झाली. दोघांचे सूत जुळले. त्यांच्यातील प्रेमसंबंध कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. राहुल हा हातमजुरी करायचा. दोन-तीन महिने सुखात गेल्यानंतर कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात खटके उडत होते. कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी पेलण्यासाठी ती सक्षम नव्हती. तो पूर्वीप्रमाणे तिला वेळ देत नव्हता, अशी तिची तक्रार होती.
मंगळवारी सकाळी चैतालीचा पती कामावर गेला होता. त्यामुळे चैताली घरी एकटीच होती. सकाळी ११ च्या सुमारास तिने सीलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास लावला. शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. तिच्या आईने खाली उतरवून राधाकृष्ण हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आजाराला कंटाळून आत्महत्या
आजाराला कंटाळून भवानीनगर येथे राहणाऱ्या फुगीयाबाई शाहू (५५) हिने गळफास लावून आत्महत्या केली. फुगीयाबाईला कर्करोग होता. तिच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी तिला दवाखान्यात जायचे होते. तिच्या मुलाने दवाखान्यात जायचे आहे असे तिला सांगितले. मुलाला होकार देऊन ती पहिल्या मजल्यावरील खोलीत गेली आणि सज्ज्याच्या हुकला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.