एटापल्ली (गडचिरोली) : जिल्ह्यात नक्षल्यांकडून रस्ता कामावरील वाहनांना लक्ष्य केले जात आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी परिसरातील ऐमली-मंगुठा गावाच्या रस्त्यावर पुन्हा 3 वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवार (ता. 12) रात्री घडली. या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते व पूल बांधकामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ येथील श्याबाबा कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत एटापल्ली तालुक्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. तालुका मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर ऐमली-मंगुठा रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास 50 ते 60 संख्येने आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी मिक्सर मशीन, टॅंकर आणि रोडरोलर जाळून टाकले. ही वाहने एटापल्ली नगरपंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंप्पावार यांच्या मालकीची होती. 30 एप्रिल रोजी दादापूर येथे नक्षल्यांनी मोठ्या प्रमाणात वाहने पेटवून दिली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून 15 जवानांसह 16 जणांचा बळी घेतला होता. यानंतर भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात दोन व्यक्तींची नक्षल्यांनी हत्या केली, तसेच कसनसूर परिसरात रस्ता कामावरील 2 वाहने जाळली होती. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा नक्षल्यांनी वाहने जाळून विकासकामांना विरोध दर्शविला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.