nitin raut on bjp
nitin raut on bjp

"वेगळा विदर्भ'च्या मुद्यावर भाजपच्या केवळ थापाच : नितीन राऊत 

नागपूर : पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने फक्त थापा मारण्याचे काम केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्यांनी विदर्भाचा विकास केला नाही आणि स्वतंत्र विदर्भही केला नाही अशा शब्दात नवनिर्वाचित मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजवर आरोप केले. 

सरकारने विश्‍वासमत जिंकल्यानंतर राऊत सोमवारी (ता. 2) प्रथमच नागपूरला आले. त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केले. येथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षात असताना भाजपने नेहमीच स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार केला. यासाठी आंदोलने केली. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यास विदर्भाचे वेगळे राज्य करून अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी वारंवार जाहीर केले होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरला जाईल, सर्व प्रकल्प मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. भाजपने फक्त थापा मारण्याचेच काम केले. 

राज्यावर सहा लाख कोटींचे 
शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत जाहीर केली जाणार आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. राज्यावर चार लाख 31 हजार कोटींचे कर्ज आहे. याशिवाय आणि दोन लाख कोटींचे असे एकूण सहा लाख कोटींचे कर्ज आहे. यावर श्‍वेतपत्रिका काढण्यात येणार असून त्यात कर्जातून बाहेर पडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपयायोजनांचाही समावेश राहणार आहे. राज्य अडचणीत असले तरी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ते पूर्णही करतील असे नितीन राऊत यांनी सांगितले. 

कॉंग्रेसने दिला समतेचा संदेश 
शेतकरी आणि ओबीसींसाठी झटणारे नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष व आपल्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यास पहिल्याच मंत्रिमंडळात सामावून घेऊन कॉंग्रेसने समतेचा संदेश दिला. आमचे सरकार स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वावर पाच वर्षे चालणार असल्याचा विश्‍वास राऊत यांनी व्यक्त केला. 

अधिक वाचा - नाना भाऊ, आता जरा दमानं घ्या..

"दाल मे काला' 
भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी तीन दिवसांच्या भाजपच्या कार्यकाळात 40 हजार कोटी रुपये केंद्राला वळते केल्याच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा करावा. पक्षाच्या एक जबाबदार नेता बोलल्याने "दाल मे कुछ काला है' असेही राऊत म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा 
युती सरकारच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी भगवी पत्रिकाही काढली होती. हीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यांच्याकडून विदर्भाला मोठ्या अपेक्षा आहेत. येथील रखडलेले सिंचन विकासाचे ते प्रकल्प पूर्ण करीत अशी आशाही राऊत यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com