पैनगंगा नदीपात्रातील आंदोलनाची सांगता

yavatmal
yavatmal

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील बोरी चातारी येथील पैनगंगा नदीपात्रात गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेले धरणे आंदोलन सोमवारी रात्री आठदरम्यान स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले.

जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी इसापूर धरणातून 5 दलघमी व नांदेड जिल्हाधिकारी यांनी 7 दलघमी पाणी पैनगंगेच्या पात्रातून  पिण्यासाठी सोडण्याचा आदेश सोमवारी दिला. आमदार राजेंद्र नजरधने यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आंदोलकाशी चर्चा केली. अखेर आंदोलकानी धरणे मागे घेण्याचा निर्णय घेतला. आदेशानुसार ब्राह्मणगाव वितरिकेतून रात्री 8.15 ला पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, बाबुराव कदम, एसडीओ स्वप्नील कापडणीस, शाखा अभियंता विनोद पाटील, सुनील टाक, आंदोलक तुकाराम माने, धनंजय माने, चक्रधर देवसरकर, प्रकाश माने, श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती.

आंदोलकाशी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com