‘संयम संपला; आता सरकारवर दबाव’

‘संयम संपला; आता सरकारवर दबाव’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (नागपूर) - अयोध्येतील राममंदिरासाठी अट्टहास कायम ठेवत सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. सरकारच्या आश्‍वासनांमुळे आतापर्यंत बाळगलेला संयम संपला आहे, असा इशारा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज दिला. सर्वोच्च न्यायालय टाळाटाळ करीत असेल, तर कायदा करावा, असा सल्ला त्यांनी दिला. 

विश्‍व हिंदू परिषदेतर्फे भव्य हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, साध्वी ऋतंभरा, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोककुमार आणि विहिंपचे इतर नेते, संत उपस्थित होते. ‘हिंदू समाज संयम बाळगत असल्याने राममंदिरासाठीच्या लढ्याला तीस वर्षे लागली. आज सर्वोच्च न्यायालयही सत्य व न्याय टाळत आहे. अयोध्या हे रामजन्मभूमीचे स्थान आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मंदिर तेथे बनेलच, या विश्‍वासावर प्रतीक्षा केली. आता राममंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या प्राथमिकतेवर नाही. यामुळे सरकारने अयोध्येत भव्य राममंदिरासाठी लवकर कायदा करावा, असे ते म्हणाले. 

कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज व्यक्त करीत त्यांनी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोककुमार यांनी दिलेला जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी अविरत काम करण्याचे आवाहन रामभक्तांना केले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी कारसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने जनक्षोभ उसळला होता. जनहिताचे काम रोखले तर त्यांचा 

परिणाम काय होते, हे त्या वेळी दिसून आले, असे नमूद करीत त्यांनी सरकारला इशाराही दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com