‘भावनांशी खेळणे सरकारचे काम नव्हे’

‘भावनांशी खेळणे सरकारचे काम नव्हे’

नागपूर -  ‘वृत्तपत्र विक्रेते वारा, पाऊस, वादळ झेलत काम करतात. मात्र त्यांच्या कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीत कामगारमंत्र्यांचे जाते काय? एकदा कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी कोणत्या, हे तरी सांगावे. सातत्याने लोकांच्या भावनांशी खेळणे चांगल्या सरकारचे काम नाही,’ असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्‍त केले. 

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सुभाष देसाई बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या वेळी देसाई म्हणाले, की वृद्धकाळातही वृत्तपत्र विकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी निवृत्ती वेतन जाहीर होणे गरजेचे आहे. सुटलेल्या समस्यांपेक्षा थकीत समस्या भरपूर असल्याने संघटन अजून मजबूत असण्याची गरज आहे. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची आवश्‍यकता असल्याचे सांगत मागणी सभागृहात उचलून धरणार असल्याची ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com