यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मतदारांमध्ये निरुत्साह

file photo
file photo

यवतमाळ : जिल्ह्यातील सात मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) मतदानप्रक्रिया सुरू आहे. सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत 33.19 टक्के मतदान झालेले होते. शहरी भागात निरुत्साह असल्याचे बघावयास मिळाले.
सकाळी मतदानाला प्रारंभ झाला, त्यावेळी मतदानासाठी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदारांची प्रतीक्षा करावी लागली. नऊनंतर मतदार घराबाहेर पडले. वणी येथे एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रणा दोन वेळा बंद पडल्याने दोन तास कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. बाभूळगाव तालुक्‍यातील टाकळी येथे ईव्हीएम काही वेळासाठी बंद पडली होती. दुपारी दोननंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत यवतमाळ मतदारसंघात सर्वांत कमी 26.69 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. वणीत 34.92, राळेगाव 34.4, दिग्रस 37.72 टक्के, आर्णी 34.36 टक्के, पुसद 33.44 टक्के, उमरखेड 33.46 टक्के याप्रमाणे सरासरी 33.19 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह दिग्गज नेत्यांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मतदान करून केंद्राचा आढावा घेतला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com