पाणी नसल्याने जलविद्युत प्रकल्प रखडले

File photo
File photo

अमरावती : राज्यातील सिंचन प्रकल्पांवर जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम रखडले आहे. दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने खासगीकरणाच्या माध्यमातून बीओटीवर प्रकल्पांच्या उभारणीच्या धोरणालाही धक्का बसू लागला आहे. राज्यात 733 मेगावॉट क्षमतेचे लहान जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यास वाव असताना आतापर्यंत केवळ 278.6 मेगावॉट क्षमतेचे विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाले. असे असले तरी यापैकी बहुतांश पाणी नसल्याने बंद पडू लागले आहेत. खासगीकरणातून लहान जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणाअंतर्गत 283 मेगावॉट क्षमतेच्या 104 प्रकल्पांसाठी वर्ष 2013 मध्ये प्रवर्तक निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, अजूनही ऊर्जानिर्मिती 278 मेगावॉटच्या पुढे जाऊ शकली नाही. तत्पूर्वी, 2004-05 पर्यंत राज्यात 200 मेगावॉट क्षमतेचे लघू-जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले होते. गेल्या तेरा वर्षांत त्यात केवळ 78 मेगावॉटची भर पडली. राज्यात जलविद्युत प्रकल्पांचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून केले जाते. शासनातर्फे पवन, सौर, बायोमास, उसाच्या चिपाडापासून वीजनिर्मिती अशा नवीन ऊर्जास्रोतांमध्ये लघू जलविद्युत प्रकल्पांतून 2 हजार 636 मेगावॉट क्षमतेचे 34 जलविद्युत प्रकल्प आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहेत. खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या 17 जलविद्युत प्रकल्पांची क्षमता 77 मेगावॉटची आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 58 जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांची स्थापित क्षमता 3 हजार 605 मेगावॉटवर पोहोचली आहे. शासनाने 25 मेगावॉट क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या लहान जलविद्युत प्रकल्पांची उभारणी खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याचे धोरण स्वीकारले. सुरुवातीला गुंतवणूकदारांनी उत्साह दाखवला, पण तो आता मावळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com