अमदाचं साल लईच भारी! 

file Photo
file Photo

सावनेर (जि.नागपूर)  : तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात पीकस्थिती उत्तम असताना गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील कपाशीसह सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. खोलगट भागाच्या शेतातील पिके उद्‌ध्वस्त होत असताना "अमदाचं साल भी लईच भारी' असे शेतकरी म्हणू लागले आहेत. 
गत चार-पाच वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे उदासीन धोरण, वाढती मजुरी, खत व बियाण्यांमध्ये झालेली भाववाढ आणि अधूनमधून येणारा दुष्काळ यामुळे शेती परवडत नसल्याचे निराशाजनक चित्र सध्या आहे. शेतकऱ्यांचे अगोदरच आर्थिक कंबरडे मोडले असताना यंदाच्या खरीप हंगामात उत्तम उत्पादनाची आस ठेवून मुलाबाळांप्रमाणे पिकांची जोपासना करणारा कष्टकरी शेतकरी हताश दिसत आहे. सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची गडद छाया दिसून येत असल्याने परिसरातील बहुतेक शेतकरी धास्तावले आहेत. सप्टेंबर महिन्यात संततधार पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. सर्वच पिके पाण्याखाली येऊन सडू लागली आहेत. सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. कपाशी पिकाच्या फूलपात्याला गळती व लागलेली बोंडेही गळून पडत आहेत. कपाशीवर मावा, तुडतुडा आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पिकावर तंबाखू अळीचा प्रादुर्भाव व पाण्याखाली आल्याने विविध रोगांच्या विळख्यात सापडले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com