अमरावती : गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले आहे. जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्यात सर्वाधिक ५५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असल्याने या तालुक्यातील राजकीय वातावरण सर्वाधिक तापले आहे. तर तिवसा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजेच २९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, आतापासून पॅनेल सेटिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आपल्याला पॅनेलमध्ये स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
अवघ्या १० दिवसांवर नामांकन अर्ज दाखल करण्याचा अवधी असल्याने गावपुढारी व कार्यकत्र्यांमधील लगबग चांगलीच वाढली आहे. २३ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात होत आहे. अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार असून धामणगावरेल्वे तालुक्यात सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती आहेत.
टक्कर देण्याची तयारी
आता नामांकन सुरू होण्यासाठी १० दिवस उरले असून ग्रामपंचायतस्तरावर स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी सक्षम पॅनेलच्या निर्मितीवर बहुतांश नेतेमंडळींचा जोर आहे. मागील वेळी केलेल्या चुका या वेळी करायच्या नाहीत, अशी खूणगाठ मनाशी बांधून नव्यांना संधी देण्याचे धोरण बहुतांश ठिकाणी राबविले जाणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.
अशी आहे ग्रामपंचायतची संख्या
अमरावती ४६, भातकुली ३६, तिवसा २९, दर्यापूर ५०, मोर्शी ३९, वरुड ४१, अंजनगावसुर्जी ३४, अचलपूर ४४, धारणी ३५, चिखलदरा २३, नांदगाव ५१, चांदूररेल्वे २९, चांदूरबाजार ४१, धामणगावरेल्वे ५५.
संपादन - अंतर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.