नाकर्त्या सरकारला खाली खेचा

aashish deshmukh
aashish deshmukh

नाकर्त्या सरकारला खाली खेचा
नागपूर : चार वर्षांत राज्य सरकारला जनहिताचे एकही धोरण राबविता आले नाही. या काळात शेतकऱ्यांची दुर्दशा, बेरोजगारी, महागाई वाढली आहे. रोजगारवाढीच्या घोषणा फसव्या ठरल्याने नाकर्त्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी राज्यातील आमदारांना केले आहे.
देशमुख यांनी मंत्री, आमदारांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या अपयशाचा आलेख मांडला आहे. चार वर्षांत सरकारने विकासापेक्षा धार्मिक उन्माद व अस्मितेच्या प्रश्‍नांना महत्त्व दिले. पक्षांतर्गत दडपशाही व सरकारच्या अकार्यक्षमतेबद्दल अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्‍वासन दिले गेले. हा मुद्दा विधानसभेत सातत्याने मांडला; परंतु काहीच फायदा झाला नाही, अशी खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यातून रोजगार मिळाल्याचे दिसत नाही. एमआयडीसीत एकसुद्धा नवीन उद्योग आला नाही. पारदर्शकता आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची केवळ जाहिरातबाजी केली, असेही आशीष देशमुख म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com