पीककर्ज मेळाव्यात तक्रारींचा पाऊस

file photo
file photo

यवतमाळ : खरीप हंगामाला सुरुवात होऊनही शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. त्यांना कर्ज देताना बॅंका आखडता हात घेत आहेत. कर्जाच्या पुनर्गठनासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. अशा अनेक तक्रारींचा पाऊस पीककर्ज मेळाव्यात पडला.
दारव्हा येथे रविवारी (ता.23) कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून बॅंकांच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मेळाव्याची सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अधिकारी मेळाव्याला गैरहजर राहिले. सेंट्रल बॅंकेचे दारव्हा येथील व्यवस्थापक फक्त दलालामार्फत काम करतात. आपले कुणीच काही करू शकत नाही, या तोऱ्यात वागतात. अनुदानाची बचत खात्यात आलेली व इतर उत्पन्नातून आलेली मदतसुद्धा ब्लॉक केल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी केली. बॅंक व्यवस्थापकाला पोलिसांचे वाहन पाठवून आण्यात आले.
दुष्काळग्रस्तांना पीककर्जाची घोषणा
सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येणार आहे. कुणालाही वंचित ठेवण्यात येणार नाही, अशी घोषणा स्टेट बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक इमियाज परवेझ यांनी केली. त्यामुळे मेळाव्यातील वातावरण काहिसे शांत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com