परतीच्या पावसाचा संत्र्याला फटका, पानेही गळाली

परतीच्या पावसाचा संत्र्याला फटका, पानेही गळाली

जलालखेडा, (जि. नागपूर)  : मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदा शेतकऱ्यांना हवालदिल करणारा ठरला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणेज विदर्भाचा कॅलिफोर्निया मानल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादक पट्ट्यातील नरखेड तालुक्‍यातील संत्रा व मोसंबी बागायतदारांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 
परतीच्या पावसामुळे हाती आलेले सोयाबीनचे पीक पाण्यामुळे वाया गेले. कपाशीचे पीकसुद्धा पाण्यामुळे खराब झाले आहे. तसेच भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. महेंद्री येथील नारायण नाखले यांची 1.89 हेक्‍टरमधील संत्रा व मोसंबीचे झाडे आहेत. त्यामध्ये दोनशे संत्र्याची तर शंभर मोसंबीची झाडे आहेत. या वर्षी संत्र्याचा बगीचा चांगला आला होता. चांगले उत्पन्न मिळणार असल्याने कर्ज फेडण्याचा त्याचा विचार होता. मात्र, त्यांच्या या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फिरविले. हाती आलेले संत्र्याचे पीक पावसामुळे वादळामुळे पूर्णपणे कोसळले. त्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. झालेल्या नुकसानाचा शासनाने त्वरित पंचनामा करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी या नारायण नाखले यांनी केली आहे. हेक्‍टरी कमीत कमी 50 हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी केली आहे. 

फोटो पाठवा पण कसा 
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी अद्याप कृषी विभागाकडून करण्यात आली नाही. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे फोटो काढून पाठवावे, तोच पुरावा ग्राह्य धरू. परंतु, पिकांचे फोटो काढायला महागडा मोबाईल आणायचा कुठून. उदरनिर्वाह करायचा की फोटो काढण्यासाठी महागडा मोबाईल घ्यावा असा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com