परतवाडा (जि. अमरावती) : सध्या सुरू असलेल्या पावसाने (amravati rain) अनेक भागांतील रस्ते चिखलात गेले तर पायाभूत सुविधांअभावी मागील आठ-दहा वर्षांपासून ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी कुठे गायब आहेत? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. (roads are muddy due to heavy rain in paratwada of amravati)
कांडली ग्रामपंचायतमधील रश्मीनगर, पांडुरंगनगर यांसह अन्य भागात पायाभूत सुविधा नसल्याने येथील ग्रामस्थांना मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नरकयातना सोसाव्या लागत आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाने रस्ते चिखलात गेले, तर नाल्यांअभावी ठिकठिकाणी गटारगंगा साचलेली आहे. यामुळे तेथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. आतातरी लोकप्रतिनिधींनी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्या तसेच रस्ते दुरुस्त करावे. मुरूम टाकून पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.