संभाजी ब्रिगेड निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Manoj Akhare
Manoj Akhare

अकोला : संभाजी ब्रिगेडने २०१९ च्या निवडणुकीसाठी स्वराज्य संकल्प अभियान उभे केले आहे. व्यवस्था परिवर्तनाचे उद्दीष्ट' घेऊन निर्णायक लढ्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील मेळाव्याच्या अनुषंगाने व्यापक जनजागृतीचे अभियान सुरू केले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोजदादा आखरे यांनी माहिती दिली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, औरंगाबाद येथून ९ डिसेंबरला याच दिवशी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार आहेत. गेल्या २८ वर्षापासून समाजकारण करताना महापुरुषांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत रुजविण्यासाठी समाजकारणासह राजकारणाची कास धरावी लागणार आहे. शासन जनतेची दिशाभूल करित असून मराठा आरक्षणाचेही राजकारण करित असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

विधानसभेच्या शंभर जागा लढविणार
शेतमालाला हमीभाव आणि दारूमुक्त गाव या संकल्पनेवर कष्टकऱ्याच्या मुलाला मुख्य प्रवाहात घेऊन येण्याकरिता लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या शंभर जागा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

स्वबळावर लढणार
राज्यभर प्रबोधन करीत असताना आगामी निवडणूकीत मोठ्या ताकदीने उतरत असताना संभाजी ब्रिगेडला कुणाचा राजकीय आधार घेण्याची आम्हाला गरज नाही. आपल्या चळवळीतला नेता कोणाच्याही ताटाखालचे मांजर होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com